जावू तेव्हा आपुल्या आठवणी
मनात घर जातील करुनी
सुख दुःखातील भागीदारी
सहज अशी हि न संपणारी
मन हे विव्हळेन करेन तांडव
घडेल मनस्मृतींचे दर्शन
गतकालातील चित्रे रंगीन
डोळ्यांसमोरून जातील तरळून
कधी रडणारे कधी रुसणारे
आठवतील ते हसरे चेहरे
भांडणात त्या स्नेहची दडला
भांडणात त्या स्नेहची दडला
सांगा कुणा मी कसे विसरावे
तळमळणाऱ्या तडफडणाऱ्या
आनंदाने बागडणाऱ्या
दिक्कालातून येतील परतून
आठवणी त्या रानफुलांच्या
Chaan.
ReplyDeleteMast
ReplyDeleteकोण देते खतपाणी त्या रानफुलांना
ReplyDeleteत्रीणि आनंद देते पहाणार्यांच्या मनांना
खंत नाही कालान्तरे मुरझून जाण्याचा
सुखं दु:ग ना त्यांच्या उमलण्याचा
चिरंतन आठवण मात्र रहाते पहाणार्याच्या मनाना
जशी आठवण राहिली त्या रानफुलांची तुला
तशी आठवण राहील तुझ्या कवित्वाची मला
खूप सुंदर लिहिता तुम्ही
Delete